महावितरणच्या ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले; तीन महिन्यांत ६६ कोटींची चोरी उघड
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
महाराष्ट्रात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने (MSEDCL) तैनात केलेल्या डिजिटल एआय (AI) नेटवर्क आणि भरारी पथकांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एआयच्या मदतीने राज्यभरात वीजचोरीची तब्बल २७ हजार ९६४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महावितरणच्या आकडेवारीनुसार, उघडकीस आलेल्या प्रकरणांपैकी २४ हजार ५०८ प्रकरणांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन पूर्ण झाले असून, याद्वारे अंदाजे ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी समोर आली आहे. महावितरणचे डेटा तज्ज्ञ एआय मॉड्यूलच्या साहाय्याने वीज वापराच्या पद्धतींमधील सूक्ष्म बदलांवर सतत लक्ष ठेवून असतात. ग्राहकांच्या वीज वापरात अचानक घट किंवा संशयास्पद बदल आढळल्यास, ते कनेक्शन तत्काळ तपासणीसाठी चिन्हांकित केले जाते आणि १९० भरारी पथके घटनास्थळी धाव घेतात.
चोरीची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर महावितरणने संबंधित ग्राहकांना सुधारित बिले आणि दंड जारी केला आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत:
- १० हजार ८१० प्रकरणांमध्ये एकूण २९.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
- चोरीची रक्कम आणि तडजोडीचे शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत.
- राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये २८९ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत.
विभागीय आकडेवारी (वीजचोरीची सर्वाधिक प्रकरणे)
- कोकण विभाग: ११,०८३ (सर्वाधिक)
- नागपूर विभाग: ५,९४९
- पुणे विभाग: ५,८४९
- छत्रपती संभाजीनगर विभाग: ५,०८३
एआय तंत्रज्ञान आणि भरारी पथकांच्या या प्रभावी समन्वयामुळे वीजचोरीच्या पारंपरिक क्लृप्त्या आता कुचकामी ठरत असून, वीजचोरांवर मोठा जरब बसला आहे.
