राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुरस्कार: महाराष्ट्राची देशात ऐतिहासिक मुसंडी; एकूण ५७ पैकी २१ पुरस्कारांवर कोरले नाव
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोन्ही वर्षांतील मिळून एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या नावावर केले आहेत.
सर्वोत्कृष्ट ‘वसंतदादा पाटील’ पुरस्कार विजेते
- २०२४-२५: भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे
- २०२५-२६: क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, सांगली
वर्ष २०२४-२५ मधील प्रमुख विजेते
- ऊस विकास (उच्च उतारा गट): श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर (प्रथम)
- तांत्रिक कार्यक्षमता: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सातारा (प्रथम)
- आर्थिक व्यवस्थापन: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सोलापूर (तृतीय)
- सर्वाधिक साखर उतारा: भोगावती सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना (उच्च उतारा): छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर
वर्ष २०२५-२६ मधील प्रमुख विजेते
- तांत्रिक कार्यक्षमता: निरा-भीमा सहकारी साखर कारखाना, पुणे (प्रथम), विलास सहकारी साखर कारखाना, लातूर (द्वितीय), श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे (तृतीय)
- ऊस विकास (उच्च उतारा गट): सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, सोलापूर (तृतीय)
- सर्वाधिक साखर उतारा: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा
- सामाजिक उत्तरदायित्व (CSR): राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातला प्रत्येकी ८, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी ५, हरियाणाला ३, कर्नाटक व छत्तीसगडला प्रत्येकी २, तर मध्य प्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी १ पुरस्कार मिळाला आहे. कारखान्यांची कार्यक्षमता, ऊस विकास, तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक व्यवस्थापन, साखर उतारा, सहकारी व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व या निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली येथे लवकरच होणार आहे. या सोहळ्यासाठी मान्यवर केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मंत्री आणि साखर उद्योगातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साखर उद्योगातील संशोधन आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी यंदा विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच, महासंघाकडून यंदा ऊस उत्पादकता वाढ, पाणी व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अचूक शेती आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला जात आहे.
