Skip to main content

Image

अतिक्रमण कारवाई दरम्यान तरुणाने स्वतःला पेटवले

प्रतिनिधी

नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईला तेथे घर व गोठे असलेल्यांचा विरोध होता. येथे पथक गोठा तोडायला येताच एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यात तो ७० टक्के भाजल्याने येथे खळबळ उडाली. या अत्यवस्थ तरुणाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयातून नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवून दाखल केले गेले.

अरविंद रमेश बांबल (३८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मौजा बेलोना सर्व्हे नं. २३० हा महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल म्हणून नमुद आहे. येथे जनावरांना उभे राहण्याकरिता अशी नोंद महसूल विभागाकडे आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरातील पेठ विभागाच्या वार्ड क्र. ३ येथील जागेवर मागील २५ वर्षापुर्वीपासून सहा ते सात कुटुबांनी अतिक्रमण करुन घरे व जनावरांचे गोठे बांधले.

सदर अतिक्रमणाच्या जागेवर ग्राम पंचायतकडून कर लावून त्याची वसुलीही केली जाते. जखमी अरविंदचे वडील रमेश बांबल यांना सदर ग्राम पंचायतकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी १ वाजता ग्राम पंचायत चमूने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टर घेवून अतिक्रमन स्थळ गाठले. येथे बांबल यांच्या कुटुंबियांनी अतिक्रमणाच्या कारवाईला कडाडून विरोध केला. ही कारवाई केवळ रमेश बांबल यांच्या अतिक्रमाणावरच करण्याचा घाट असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान ग्राम पंचायतच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागात कारवाई सुरू केली. हे पथक बांबल यांच्या गोठा पाडण्यासाठी येताच अरविंदने गोठ्यात लपवून ठेवलेले पेट्रोल स्वत:चा अंगावर टाकले. त्यानंतर लगेच त्याने स्वत:ला पेटवून टाकले.

अरविंद आगीत सापडल्याचे बघत तेथे खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांकडून त्याला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु आग विझेपर्यंत अरविंद गंभीररित्या भाजला होता. तातडीने त्याला उपस्थितांकडून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. येथे प्राथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे बघत तातडीने त्याला नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवण्या आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत रुग्णावर उपचार सुरू आहे. दरम्यान अरविंदने स्वत:ला पेटवल्याचे बघत ग्राम पंचायतची अतिक्रमणविरोधा पथकाने येथून काढला पाय घेतला. परंतु ही कारवाई नियमानुसार असल्याचे ग्राम पंचायतच्या अतिक्रमनविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणने होते.

पावसाळयात अतिक्रमण हटवू नये असा शासनाचा नियम आहे. सोबत झुडपी जंगलावरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार केवळ वन विभागाला आहे. या जागेशी ग्राम पंचायतचा संबंध येत नाही. त्यानंतरही ग्राम पंचायतकडून कुणाच्या दबावात अतिक्रमण पाडण्याची कारवाई करत आहे? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची गरज आहे, असा आरोप बांबल कुटुंबियांनी केला.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026