मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 13 February 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 13, 2026 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्य निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालविण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण होत आहे. नियमानुसार नव्या निवडणुका होणे अपेक्षित असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब झाल्यास ग्रामपंचायती बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार, विकासकामे, कर वसुली, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामे प्रशासकांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत.?

प्रशासक म्हणून साधारणतः गटविकास अधिकारी किंवा संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. प्रशासकांना नियमित बैठका घेऊन प्रलंबित कामांना गती देणे, निधीचा योग्य वापर करणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे अशी जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असून स्थानिक पातळीवर बैठका, चर्चासत्रे आणि गटबाजीही वाढताना दिसत आहे. निवडणुका लवकर जाहीर व्हाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, जेणेकरून लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत विकासकामांना गती मिळेल.

तालुक्यातील विकासकामे रखडू नयेत आणि प्रशासन पारदर्शकपणे चालावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीची प्रक्रिया सुरू होणार असून, त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख