निरंकारी इंग्लिश मीडियम संत समागमात प्रेम, शांती आणि एकत्वाचा संदेश
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पुणे झोनचा निरंकारी इंग्लिश मीडियम संत समागम रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी महालक्ष्मी लॉन्स, खराडी, पुणे येथे श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. या समागमात मोठ्या संख्येने श्रद्धाळू, संत-महात्मा आणि सेवादार सहभागी झाले.
यावेळी श्रद्धाळूंना संबोधित करताना श्री. राकेश मुटरेजा जी यांनी प्रेम, शांती आणि एकत्वाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, जसे एका छोट्या बीजातून विशाल वृक्ष आणि अनेक वृक्षांतून वनाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात रुजलेले प्रेम, शांती आणि सद्भावनेचे विचार समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात.
निरंकारी प्रदर्शनीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ज्या प्रकारे वृक्ष-वेलींच्या वाढीमुळे परिसर पक्षी व जीव-जंतूंसाठी अनुकूल बनतो, त्याचप्रमाणे सद्गुरुंच्या शिकवणीचे संस्कार जीवनात रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंब आणि समाजावरही होतो. युवा वर्गाला सत्संगतीचे महत्त्व समजावून सांगताना माशांचा बाजार आणि अत्तराचा बाजार यांचे उदाहरण देण्यात आले. संत-महात्म्यांच्या संगतीत राहिल्याने त्यांच्या सकारात्मक विचारांचा आणि आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव जीवनावर पडतो, असे त्यांनी सांगितले.
परमात्म्याने निर्माण केलेली प्रत्येक रचना पूर्ण आहे. त्यामुळे जीवनातील परिस्थिती सहजतेने स्वीकारून शुकराण्याच्या भावनेने जीवन जगावे, असा संदेशही देण्यात आला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून मानवाला संकुचित विचारांपासून मुक्त करून जीवनाकडे सकारात्मक आणि व्यापक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देत आहेत.
या संत समागमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या निरंकारी प्रदर्शनीतून आध्यात्मिक विचार आणि जीवनमूल्ये सोप्या व प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली. संत निरंकारी मिशन मानवाला निराकार परमात्म्याची ओळख करून देत प्रेम, शांती, बंधुभाव, सहनशीलता आणि मानवी एकत्वाची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देत आहे.
पुणे झोनचे प्रभारी श्री. अशोक आहुजा जी यांनी संत समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व श्रद्धाळू, संत-महात्मा आणि सेवादारांचे आभार मानले.
