• Home
  • इतर
  • मुढाळे गावातील शुद्ध पाणी प्रकल्प नावापुरताच का खरंच मिळणार का नागरिकांना शुद्ध पाणी?
Image

मुढाळे गावातील शुद्ध पाणी प्रकल्प नावापुरताच का खरंच मिळणार का नागरिकांना शुद्ध पाणी?

*प्रतिनिधी मुढाळे- विजय गायकवाड*
बारामती तालुक्यातील मुढाळे गाव येथे मिळालेल्या माहितीनुसार *15 व्या वित्तआयोगा* मार्फत शुद्ध पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी योजना सर्वत्र चालू आहे. मुढाळे गाव येथील हा शुद्ध पाणी प्रकल्प फक्त नावापुरता उभा करण्यात आलेला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या योजनेचा कोणालाही लाभ घेता येत नाही. हा प्रकल्प तयार होऊन दोन महिने झाले. पण तरीसुद्धा आता तो चालू झाल्यापासून नादुरुस्तच आहे व त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. हा प्रकल्प सुरू होऊन दोन महिने झाले पण नागरिकांचे म्हणणे आहे याचा वापर कोणालाही करता आला नाही. हा प्रकल्प बंदच आहे .फक्त नावापुरता चालू केलेला आहे. याचा नागरिकांना काहीही फायदा झाला नाही.पाच रुपयांमध्ये शुद्ध वीस लिटर पाणी या योजने;अंतर्गत नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते.परंतु या झालेल्या वॉटर प्लांट चा फायदा नागरिकांना घेता येत नसून हा बंदच आहे. दुरुस्तीचे काम होत नाही.त्यातच आता उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा भेडसावत आहे. त्यातच गावामध्ये झालेला हा शुद्ध पाणी प्रकल्प याचाही त्यांना फायदा घेता येत नाही .त्यामुळे नागरिकांचे एवढेच म्हणणे आहे हा फक्त नावापुरता शुद्ध पाणी प्रकल्प आहे का? का फक्त निधी लाटण्यापुरताच हा वॉटर प्लांट उभा करण्यात आला आहे का?

नक्की हा वॉटर प्लांट कशासाठी उभा करण्यात आला आहे. ही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे .तरी नागरिकांना लवकरात लवकर हा शुद्ध पाणी प्रकल्प दुरुस्त करून भेटावा व त्याचा लाभ घेता येईल ही नागरिकांची विनंती आहे. असेच त्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तसेच दूषित पाण्यामुळे असंख्य आजार होत आहेत. कॉलरा ,गॅस्ट्रो, कावीळ अशा अनेक आजारांपासून नागरिकांचे संरक्षण होईल. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता दोन दिवसांमध्ये चालू होईल. तसेच विविध कारणे मिळत आहेत. अशी वारंवार त्यांना उत्तर मिळत आहेत. परंतु या प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम होत नाही प्रकल्प बंदच आहे. त्याची दक्षता कोण घेणार? हा नागरिकांना प्रश्न पडला आहे. त्यांना शुद्ध पाणी मिळणारच नाही का हा पण त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025