• Home
  • इतर
  • बारामती ! वडगाव निंबाळकर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न .
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी वडगाव निंबाळकर ( ता .बारामती ) येथे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक एक क्रांतीज्योत या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान सुप्रसिद्ध व्याख्याते सागर चव्हाण पुरंदर यांनी केले . कार्यक्रमा अगोदर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराजे राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत उपसरपंच संगीता भाभी शहा ,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे, अजित भोसले ,प्रमोद कर्वे, अश्विनी खोमणे ,प्रेमलता रांगोळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमणे, जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा युवती अध्यक्ष तेजश्री भंडलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

व्याख्यान करत असताना व्याख्याते सागर चव्हाण यांनी आपले व्याख्यानामध्ये मत मांडत असता म्हणाले जिंदगीत आई-वडिलांपेक्षा मोठे कोणीही नाही आई-वडिलांचे मान खाली होणार नाही असे आपण कुठले कृत्य करू नये अशी शिकवण आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची आहे हे त्यांनी व्याख्यान करत असताना मांडले .

या कार्यक्रमाचे आयोजन आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर चे अध्यक्ष सुनील खोमणे यांनी केले आहे . सुनील खोमणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या रीतीने करून कार्यक्रम पार पाडला . वक्ते सागर चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानामार्फत उपस्थित सर्वांना राजे उमाजी नाईक यांचे लहान पासून चे त्यांच्या शेवटपर्यंत रामोशी समाजासाठी काय व कशाप्रकारे बलिदान दिले हे व्याख्याना मार्फत प्रमुख वक्ते सागर चव्हाण यांनी मांडले .

कार्यक्रमावेळी मान्यवर व एमपीएसी व यूपीएसी मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे सत्कार करण्यात आले . आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने भीवडी येतून दि.७ रोजी क्रांतिज्योती आणण्यात येणार आहे व सायंकाळी भव्य मिरवणूक काडली जाणार आहे आणि महप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आध्यक्ष सुनील खोमणे यांनी सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर व अमोल गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचा शेवट आभार अध्यक्ष सुनील खोमणे यांनी मानले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025