Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! चोपडज ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ; पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन .
Image

बारामती ! चोपडज ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ; पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन .

प्रतिनिधी –

गेल्या अनेक दिवसांपासून वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊनही बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याकारणाने तसेच स्थानिक राजकारणापोटी चोपडज (पांढरवस्ती) येथील भूमिहीन बेघर कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत असल्याकारणाने दिनांक २१ मे रोजी बारामती पंचायत समिती समोर बहुजन समाज पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

या पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ यांनी ग्रामपंचायतीस तोंडी व लेखी पत्र व्यवहार करून कुठलेही प्रकारची दखल घेत नव्हती.गोरगरीब जनतेस वेळोवेळी कागदपत्रे,घरकुल,पाणी, तसेच इतर शासकीय सोयीसुविधांपासून अडवणूक होत असे पिसाळ यांनी सांगितले .

याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.काळुराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा प्रभारी चंद्रकांत खरात यांच्या सहकार्याने बारामती विधानसभा अध्यक्ष मा.दयानंद पिसाळ यांनी बेमुदत आंदोलन केले.परंतु या प्रमुख मागण्या मान्य करीत दुपारी चार वाजता लेखी मागण्या मान्य करून उप गटविकास अधिकारी नंदन जरांडे, विस्ताराधिकारी राजेंद्र चांदगुडे,घरकुल विभाग प्रमुख तसेच इतर प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांकडून बसपा तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ यांना लेखी पत्र देऊन बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा प्रभारी चंद्रकांत खरात,दादा टेकाळे,रोहित लोंढे, श्याम तेलंगे, विजय पिसाळ, भगवान कदम,व ग्रामस्थ गणपत माने,प्रशांत नवले, दत्तात्रय गायकवाड, संजय गाडेकर,यांसह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026