मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून देहव्यापार

mnewsmarathi प्रतिनिधी
February 4, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

राज्यभरातील गरीब घरच्या तरूणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ ओढणारी टोळी नागपुरात कार्यरत होती. ती टोळी तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. या टोळीचा उलगडा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने लावला. या टोळीतील १० पैकी ३ महिलांसह ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

शहरातील काही तरुणी अचानक बेपत्ता होत होत्या तसेच काही तरुणींचे थेट परराज्यात नोकरीनिमित्त जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधित पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. काही गरीब घरच्या तरुणींना लवकरात लवकर पैसे कमविण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढणारी टोळी कार्यरत असल्याचे लक्षात आले. त्यांना ‘वॉच’ ठेवून एका टोळीचा उलगडा केला. या टोळीची म्होरक्या नंदा पौनीकर आणि गीता गोयल यांनी काही तरुणींना थेट राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये बनावट लग्न लावून देऊन सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्याची माहिती समोर आली. या टोळीचा सखोल तपास केला असता नागपुरातील एका विवाहित महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये नेऊन चौघांशी लग्न लावून देऊन विक्री केल्याची घटना समोर आली.

या प्रकरणी एएचटीयू पथकाने तब्बल १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी नंदा पौनिकर (कांजीहाऊस चौक), गीता गोयल (खंडवा, इंदोर), गंगा गुरुचरण सिद्धू (सुराबर्डी), रितू बंगाली ऊर्फ रेखा खमारी (ओडीशा), प्रतीक ऊर्फ मनोज खिमजीभाई चादरा (जामनगर, गुजरात), अंकित चंदू ऊईके (इंदिरा मातानगर) यांना अटक केली. तर अन्य चार आरोपी अद्याप फरार आहेत. त्या आरोपींचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, अप्पर आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, वैभव बारंगे, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, दीपक बिंदाने, श्याम अंगथुलेवार, विलास विंचूरकर, अश्विनी खोपडेवार, शरीफ शेख यांनी केली.

राज्यभरातील गरीब तरुणींना जाळ्यात ओढल्यानंतर टोळी त्यांना कंत्राट पद्धतीने लग्न लावून देते. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची भीती नसते. त्या तरुणींशी एकाच वेळी ७ ते ८ तरुण लग्न करण्याचा बनाव करतात. त्यानंतर त्या तरुणींशी कंत्राट असलेल्या कालावधीपर्यंत सामूहिक बलात्कारासह अन्य प्रकारे लैंगिक छळ करण्यात येते. अशाप्रकारे तरुणींना थेट देहव्यापार करण्यासाठी प्रवृत्त केल्या जाते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा