मुख्य मजकुरावर जा
Monday, 24 August 2026

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतक श्रीमती रंगारी यांच्‍या कुटूंबियांसाठी मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू.चे अर्थसहाय्य जिल्हाधिका-यांच्या खात्यात वर्ग

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 30, 2022 1 मिनिट वाचन 8,506 वाचन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतली दखल

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत. या बाबत पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्या नुसार ३० नोव्हेम्बर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना पत्र पाठवून ५ लाख रुपये खात्यात वर्ग केल्याचे कळविले आहे.रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले , ३० नोव्हेम्बर रोजी सदर अर्थसहाय्य जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख