प्रतिनिधी – फिरोज भालदार
भविष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शाळा/कॉलेज असेल तरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य सुधरते व भविष्यात आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगले ज्ञान मिळवून भविष्यात काहीतरी करता येईल यामुळे पालकांनी शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले आहे. यामध्ये आता विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्लास लावण्याची गरज का पडते ? असा प्रश्न नागरिक व पालकांमध्ये पडला आहे .
प्रशालेमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का? का प्रशालेमध्ये शिकवलेच जात नाही ? यावर बारामती तालुका गटशिक्षण अधिकारी यांनी बारामती तालुक्यातील सर्व प्रशालॆऺवरती लक्ष्य देऊन शाळा / कॉलेज मधील शिक्षण यामध्ये कशी सुधारना येईल याकडे लक्ष्य दिले पाहिजे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे .
भारत हा संपूर्ण डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जातो तरी देखील काही शाळा , कॉलेजमध्ये डिजिटल सुविधा व डिजिटल पद्धतीनं शिकवत नसल्याचे निदर्शनास येत आहे ?. शाळा/कॉलेज म्हणजे संपूर्ण प्रात्यक्षिक युग झालेले आहे. हे प्रात्यक्षिक प्रशालेमध्ये शिकवून व करून दाखवले जाते का? का शिक्षक आपली शिक्षक असल्याची भूमिका फक्त पुस्तक वाचून निभावतात? शिक्षकांचे शिकवण शाळा कॉलेजमध्ये व्यवस्थित असेल तर विद्यार्थ्यांना बाहेर एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची गरज पडती का व कशासाठी? अश्या प्रश्नांची चर्चा पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये होत असताना सर्वत्र दिसत आहे .
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून बारामती गटशिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.












