मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर चाकूहल्ला

mnewsmarathi प्रतिनिधी
June 19, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून एकाने दोन मित्रांवर चाकूने हल्ला केल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली आहे. याबाबत भांडूप पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्रथमेश मौर्या (२४) आणि संतोष मिजार (२४) असे यातील जखमी तरुणांची नावे असून दोघेही भांडुपच्या श्रीराम पाडा परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी संतोष याच्या आई-वडीलांना आरोपी साहिल सिंह (२२)याने त्रास दिला होता. याबाबत दोन्ही मित्रांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार केली. याचाच राग मनात धरून आरोपी दोन्ही मित्रांना धमकावत होता. काही दिवसांपूर्वी तर आरोपीने वाद मिटवण्यासाठी दोन्ही मित्रांकडे पैशाची देखील मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच दरम्यान १३ तारखेला दोन्ही मित्र परिसरातून जात असताना त्याने दोघांना मारहाण करत, त्यांच्यावर चाकूने वार केले.

त्यात दोघांना गंभीर दुखापत झाली असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना मुलुंडच्या आगरवाल रुग्णालयात दाखल केले आहे. भांडुप पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा