Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
निंबुत येते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.
प्रतिनिधी. आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून नींबूत येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आली ज्योतीचे मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी स्वागत केले. सकाळी दहा वाजता ज्योत पूजन करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या […]
गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
प्रतिनिधी – पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा. श्री. बी. जी. गोरे (तहसीलदार), मा. श्री. जी. एम. भगत (राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख, पोलीस मित्र संघटना) तसेच मा. श्री. जानदेव बापू (सहाय्यक निरीक्षक, […]
जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात
प्रतिनिधी बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे. करण हा केवळ 25 वर्षांचा तरुण. लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरु होत्या. वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता. काही दिवसांपूर्वी त्याला *अर्धांगवायू (पॅरालिसिस)*चा झटका आला. अचानक आलेल्या या […]
निंबुत जगताप वस्ती येथे श्रीमंत राजहंस मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी. श्रीमंत राजहंस मित्रमंडळ जगताप वस्ती रुद्र प्रतिष्ठान कुरणवस्ती तसेच साई सेवा मंडळ कोळेवस्ती यांनी आज झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या खेळामध्ये ५० महिलांनी सहभाग घेतला. श्रीमंत राजहंस मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या २३ विजेत्या महिलांना प्रतेकी साडी तसेच पाहिले ३ नंबर ला १ […]
खळबळ जनक. सोमेश्वर परिसरातील आणखी एका नामांकित पतसंस्थेचा घोटाळा येणार उघडकीस?
संपादक : मधुकर बनसोडे निंबुत येथील काही दिवसापूर्वीच एका पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांचे तोंडचे पाणी पळाले. तोवरच सोमेश्वर परिसरामधील एका नामांकित पतसंस्थेची चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. सोमेश्वर परिसरामध्ये नक्कीच चालले तरी काय? गोरगरिबांनी पै-पै गोळा करून ठेवलेल्या पैशांवर पांढऱ्या कपड्यातील काळे बोके जणू नजर ठेवून असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्या […]
“जनतेच्या सुरक्षिततेला धोका: हायवेवर वर्दीशिवाय ट्रॅफिक हवालदार भ्रष्टाचार करतोय का?”
संपादक मधुकर बनसोडे. फलटण तालुक्यातील हायवेवर रात्री वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ट्रॅफिक हवालदार नाका बंदी नसतानाही वर्दीशिवाय गाड्या अडवत असून, नागरिकांकडून थेट पैशांची वसुली करत असल्याचे आरोप झाले आहेत. भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 स्पष्ट सांगतो – • कलम 130(1) नुसार चालकाने परवाना फक्त “uniformed police officer” कडेच […]
चायनीज एलईडी लाईट गाडीला वापरल्यामुळे मोटर सायकल चालकास 24 हजार रुपयांचा दंड
प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत सोमेश्वर चौकी येथे मुलगा तुषार विकास गायकवाड रा. चोपडच ता.बारामती जिल्हा पुणे हा त्यांचे ताब्यातील यामाहा मोटारसायकल रेस वाढवून चालवत असताना सोमेश्वर चौकीतील पोलीसांना मिळुन आला करंजे पुल पोलीसांनी सदर यामाहा मोटारसायकल ची पाहणी केली असता त्यास पुढील बाजूस समोरून येणाऱ्या लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा चायनीज एल ई […]
ओबीसींनी आपला संघर्ष अधिक तीव्र करावा== प्रा प्रकाश बगमारे
प्रतिनिधी ब्रह्मपुरी – मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे ओबीसी चे आरक्षण धोक्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व अन्य ओबीसी संघटना व ओबीसी समाजाचे नेते यांच्या माध्यमातून दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समस्त ओबीसी संघटना यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. […]
मराठा आंदोलनाला मोठं यश; ६ मागण्या मान्य, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं
प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंदोलनस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठा समाजाला मोठं यश मिळालं आहे. मान्य झालेल्या मागण्या राज्य सरकारने जाहीर केलेल्या […]
सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.
प्रतिनिधी – सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न करता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. रस्त्यालगत असलेली व अडथळा निर्माण करणारी झाडे अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मुळासकट उपटून सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात यावे. त्यामुळे वृक्षांना जीवनदान मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल […]
