• Home
  • माझा जिल्हा
  • इंदापूर तालुका व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नागरी सनद आणि उपस्थिती बाबत शासकीय नियमांचे पालन करावे.____युवासेना इंदापूरची मागणी
Image

इंदापूर तालुका व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नागरी सनद आणि उपस्थिती बाबत शासकीय नियमांचे पालन करावे.____युवासेना इंदापूरची मागणी

प्रतिनिधि

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय आस्थापना मध्ये सर्व सामान्य जनतेच्या कामास होत असलेली दिरंगाई आणि हेळसांडपणाच्या विरोधात युवासेना इंदापूरच्या वतीने युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, उप तालुका युवा अधिकारी अक्षय पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय प्रमुख या नात्याने मा.निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांना काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने महसूल व वन विभाग, कृषी विभाग, कृषी पशुसंवर्धन,दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विधी व न्याय विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, या सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक असून महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ करणे क्रमप्राप्त आहे तसेच आपल्या विभागाची नागरी सनद कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे तसेच या सनदीनुसार विहीत मुदतीत कामाचा निपटारा करणे बंधनकारक आहे.

इंदापूर तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे.इंदापूर हे तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असल्याने या ठिकाणी सर्व कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु अनेक वेळा शासकीय अधिकारी/कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने किंबहुना कामाचा निपटारा वेळेत करत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात.यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान होते. या विरोधात युवासेना इंदापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचा कारभार सुरळीत चालावा, अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या वेळेचे पालन करावे, तसेच विभागाच्या कार्यालयाने आपल्या नागरी सनदेचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून शासनाने नेमून दिलेल्या मुदतीत प्राप्त प्रकरणावर कारवाई करावी आणि तहसीलदार कचेरीच्या ठिकाणी तक्रार पेटी निर्माण करून सर्व सामान्य जनतेचा त्रास दुर करावा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026