सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासू लागली , उन्हाची तीव्रता वाढू लागली

सामाजिक

दहिवडी प्रतिनिधी
कोमल काळे
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अनेक भागात जस जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तस तशी पाण्याची टंचाई भासू लागली माण तालुक्यातील नवलेवाडी, सत्रेवाडी येथे पाणी टंचाई आत्तापासूनच जाणवू लागली आहे त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यामुळे ग्रामस्थांनी माण खटाव चे नेते शेखर भाऊ गोरे यांच्याकडे पाण्याच्या टँकरची


मागणी करता शेखर भाऊ गोरे यांनी स्वखर्चाने मोफत पाणी पुरवठा सुरू केला शेखर भाऊ गोरे यांनी गेली अनेक वर्ष सत्ता असो वा नसो माण खटाव तालुक्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नयेत म्हणुन स्व खर्चाने शेकडो टँकरने तालुक्यातील लोकांची तहान भागवण्यााचे काम करत आहेत यामुळे शेखर भाऊ गोरे यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे