Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • शहरांसह ग्रामीण भागात केबल चालकांकडून विद्रूपीकरण. संबंधित प्रशासनाचे मात्र हाताची घडी तोंडावर बोट!
Image

शहरांसह ग्रामीण भागात केबल चालकांकडून विद्रूपीकरण. संबंधित प्रशासनाचे मात्र हाताची घडी तोंडावर बोट!

 संपादक मधुकर बनसोडे.

 शहरी भागातील केबल इंटरनेटचे लॉन ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखे पसरले आहे मात्र केबल चालक इंटरनेट चालक महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरती अनाधिकृतपणे या केबल वायर गुंडाळून ग्रामीण भागाचे विद्रूपीकरण करीत आहेत.

 कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या ठिकाणी स्वच्छ सुंदर गाव दिसण्यासाठी सुशोभीकरण केलं त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूने महावितरण कंपनीच्या विद्युत पोल वरून टांगलेल्या केबलच्या व इंटरनेटच्या वायर ग्रामीण भागाच्या विद्रोपीकरणास कारणीभूत ठरत आहेत. एकीकडे घरातील विज बिल एक महिन्याचे जरी थकले तरी महावितरण कंपनीकडून लगेच ते खंडित करण्याचे आदेश दिले जातात मात्र दुसरीकडे कोणत्या परवानगीनुसार केबल चालकांना महावितरणच्या विद्युत पोलचा वापर करण्याची परवानगी दिली आहे याचा खुलासा महावितरण ने करावा.

 जर अशा प्रकारे कोणतीही परवानगी दिली नसेल तर महावितरण कंपनीकडून केबल चालकांवरती कारवाई का केली जात नाही?

 प्रत्येक दिवाळीला महावितरणच्या काही अधिकाऱ्यांना दिवाळी पाकीट म्हणून लाखो रुपयांचे गिफ्ट दिलं जात आहे? त्यामुळेच केबल चालकांवरती कोणतीही कारवाई होत नाही अशी चर्चा स्थानिकांमधून होत आहे. जर खरंच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतेही लाच दिली जात नसेल तर महावितरणचे अधिकारी परिसरातील सर्व केबल वायर विद्युत पोलवरून काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना देणार का?

 कि येणाऱ्या दिवाळीत लाखो रुपयाची लाच घेणार? माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सर्व माहिती घेऊन लवकरच जनतेसमोर ठेवणार.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026