संपादक मधुकर बनसोडे.
बारामती तालुका म्हणजे शिक्षणाची पंढरी मात्र याच बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा निकृष्ट पद्धतीने ढासळलेला आहे? याला नक्की जबाबदार कोण बारामती तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शाळेची तपासणी करतात का गटशिक्षण अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद च्या शाळेवरती लक्ष नसल्यामुळेच जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळत चाललेला आहे? अशी पालक वर्गातून चर्चा केली जात आहे. काही शिक्षकांनी खाजगीत बोलताना असे देखील सांगितले की शाळेत शिकवण्याचे काम कमी व शासनाची कामे जास्त असतात? त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवरती पाहिजे तेवढे लक्ष देता येत नाही. याबाबत आम्ही लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. जर आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकवायची असेल तर सर्व पालकांनी जागरूक राहून जिल्हा परिषद शाळेवर ती लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर खाजगी शिक्षण देणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही नाईलाज असतोव सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणापासून वंचित राहतील की काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
जेवढी जबाबदारी शिक्षकांची आहे तेवढीच जबाबदारी पालकांची देखील आहे हेही विसरून चालणार नाही. गट शिक्षण अधिकारी साहेब आपण आपले केबिन सोडून तालुक्यातील शाळेंवरती लक्ष केंद्रित करावे बारामती तालुक्यातील पालक वर्गातून मागणी.