• Home
  • माझा जिल्हा
  • पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे
Image

पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जुलै व ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर शेतपिकांची झालेल्‍या नुकसानापोटी शासनाने हेक्‍टरी १३,६०० रू. , महत्‍तम ३ हेक्‍टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नुकसान भरपाई संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्‍त झालेल्‍या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. गावातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे प्रत्‍यक्ष शेतावर न जाता करण्‍यात आलेले आहेत, प्रत्‍यक्षात नुकसान झालेल्‍या शेताचे क्षेत्र कमी नोंदविण्‍यात आले आहे ,काही नदीकाठील गावांचे सर्व्‍हेक्षण व पंचनामे करण्‍यात आले नाही, नुकसान भरपाई मंजूर झालेल्‍या शेतक-यांची यादी ग्राम पंचायत स्‍तरावर लावण्‍यात आलेली नसल्‍याने गावातील कोणत्‍या शेतक-याला किती नुकसान भरपाई मिळाली किंवा कसे हे लक्षात येत नाही, सर्व्‍हेक्षण करणारे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी हलगर्जीपणाने सदर सर्व्‍हेक्षण केले आहे अशा तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

Releated Posts

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक…

ByBymnewsmarathi May 4, 2026

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026