• Home
  • माझा जिल्हा
  • पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील २८०० हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Image

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील २८०० हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

 प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील सात गावांतील सुमारे २,८३२ हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘विकास हवा, पण अन्याय नको’ अशी भूमिका घेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी करत आहेत.

प्रकल्पासाठी खालील सात गावांतील जमीन संपादित होणार आहे: पारगाव मेमाणे, वणपुरी, उदाचिवाडी, कुंभारवळण, एकतपूर, मुञ्जवाडी आणि खानवडी.
या गावांतील एकूण ३,३५२ सर्वे नंबरांतील जमीन प्रकल्पासाठी घेतली जाणार आहे. तसेच ७० हेक्टर वनजमीन देखील प्रस्तावात समाविष्ट आहे.

या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पारगाव मेमाणे गावातील शेतकरी पांडुरंग मेमाणे यांनी सांगितले की, “ही जमीन केवळ मालमत्ता नाही, ती आमचं जीवन आहे. पर्यायी डोंगराळ भाग असताना सुपीक शेती जमिनी बळकावण्याचा हा निर्णय आमचं भविष्य उद्ध्वस्त करणारा आहे.”

दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) १० मार्च २०२५ रोजी या सात गावांतील जमिनी ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर करत अधिसूचना काढली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकाऱ्यांची विशेष टीम नेमण्यात आली असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक स्तरावर बैठका, आंदोलनं, आणि पत्रव्यवहार सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने या भागातील शेतजमिनी वाचवून, नापीक डोंगराळ भागात विमानतळ उभारण्याचा विचार करावा.

“स्वातंत्र्यानंतर आम्ही रस्ता मागत राहिलो, पण सरकारकडे वेळ नव्हता. आता मात्र आमच्या घरावर नांगर फिरवण्यासाठी तेच सरकार तत्पर आहे,” अशा शब्दांत एका ग्रामस्थाने आपला रोष व्यक्त केला.

शासनाने पुढील टप्प्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026