Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • तुकाराम महाराजांच्या पालखीत विद्या प्रतिष्ठानचा सायबर जयघोष
Image

तुकाराम महाराजांच्या पालखीत विद्या प्रतिष्ठानचा सायबर जयघोष

प्रतिनिधी.

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांबरोबर सायबर सुरक्षित दिंडीद्वारे सायबर जनजागृतीचे काम केले.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षित दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराजांच्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण करण्यासाठी कीर्तन उपक्रम राबवले. दैनंदिन जीवनात होणाऱ्या सायबर समस्यांवर उपाय कसे करावेत आणि काय करू नये याबद्दल विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना कीर्तनातून मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

ही सायबर सुरक्षित दिंडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर बारामतीत आली. या उपक्रमादरम्यान वारकऱ्यांनी सायबर सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेतली आणि सायबर घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित राहावे हे शिकले.
सदर दिंडीसाठी विशाल जाधव सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दिंडीसाठी सलमा शेख, शिक्षक समनव्यक, क्विक हील फाऊंडेशनचे क्लब मेंबर आणि विद्यार्थी यांनी नियोजन केले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार, बी.एस.सी. (संगणक शास्त्र) विभाग प्रमुख गजानन जोशी, बीसीए (सायन्स) विभाग प्रमुख किशोर ढाणे, गौतम कुदळे, जगदीश सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Releated Posts

सोमेश्वरच्या उच्चांकी ऊसदरामुळे सभासदांमध्ये आनंदोत्सव; चेअरमन, संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

प्रतिनिधी   बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचा निर्णय घेत अनुदानासह जवळपास ४…

ByBymnewsmarathi Aug 20, 2026

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026