• Home
  • माझा जिल्हा
  • नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार
Image

नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार

प्रतिनिधी

कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात काम करीत असताना नागपुरातील तरुणी कोलकाताच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने प्रेमासाठी आई-वडील, घर सोडून प्रेमविवाह केला आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. ती नोकरीवर लागताच तिने घटस्फोट देण्याची तयारी केली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समुपदेशन करीत तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचविला.

देवदत्त आणि रिमा (बदललेले नाव) हे दोघेही कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात सक्रीय होते. देवदत्त हा पश्चिम बंगाल-कोलकातामधील रहिवासी होता. त्याने संगीत क्षेत्रात नाव कमावले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने रिमाची नागपुरात भेट झाली. दोघेही गीत-संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्कात होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. रिमाने सासरी जाण्याऐवजी वृद्ध आईच्या सेवेसाठी देवदत्त यालाच नागपुरात राहण्याची अट ठेवली. त्याने प्रेमापोटी अट मान्य करीत प्रेमविवाह केला.

लग्नानंतर काही दिवस हालाखीत जीवन कंठले. त्यानंतर देवदत्त हा शाळेत संगीत शिक्षक म्हणून कामाला लागला. त्याने पत्नी रिमालाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी सज्ज केले. तिनेही पतीला सकारात्मकता दाखवत पदवीला प्रवेश घेतला. त्यानंतर तिने पीएचडीसुद्धा केली. दोघांचाही सुखी संसार सुरु असताना त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर तिला प्राध्यापक पदावर नोकरी लागली. त्यानंतर मात्र, रिमाच्या स्वभावात फरक पडला. ती पतीला कमी लेखायला लागली आणि पतीचा वारंवार अपमान करीत होती. त्यामुळे संसारात खटके उडायला लागले.

गलेलठ्ठ पगारासमोर पतीचा मात्र तुटपुंज्या पगारामुळे ती पतीला टोमणे मारत होती. तिच्या जीवनशैलीत बदल झाला आणि ती किट्टी पार्टी, सिनेमा, महिलांच्या बैठका, कार्यक्रम-समारंभात वावरत होती. तिला साध्याभोळ्या पतीचा कंटाळा आला होता. त्यामुळे तिला साथ देणारा मित्र हवा होता. त्यामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेण्याचा विचार केला. दुसरीकडे मात्र देवदत्त हा पत्नीच्या निर्णयामुळे खचून गेला.

पत्नीच्या निर्णयामुळे दुःखी झालेल्या देवदत्तने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी बाजू ऐकून घेतली. समुपदेशक पाटील यांनी दोघांना भरोसा सेलमध्ये बोलावले. गरीबीत काढलेले दिवस आणि शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची रिमाला आठवण करून दिली. पतीने केलेला आईवडिल, नातेगोते आणि घराचा त्याग लक्षात आणून दिला. दोघांची समजूत घातली. मुलीनेही आईशी चर्चा करून उर्वरित आयुष्यात वडिलांची साथ महत्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026