भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

Uncategorized

प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्यात “हर घर तिरंगा” अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि ‘स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद’
या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या
रयत शिक्षण संस्थेचे
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज पिलीव या प्रशालेत
आज १३ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ध्वजगीत, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून ‘भारत माता की जय’ व ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
यानिमित्त भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान देशवासी यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला सलाम केला.
याप्रसंगी प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.