प्रतिनिधी अक्षय थोरात.
दादा तुम्ही परत या दादा तुम्ही परत या.बारामती तालुक्यातील
ग्रामीण भागात संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत लाईट नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत चालले आहे त्यामुळे गरम होण्याचे प्रमाण जास्तच वाढत असल्यामुळे व एकीकडे लाईट नसल्यामुळे ग्रामस्थ हैरान झाले पाहायला मिळत आहे दुसरीकडे मुलांच्या सहामाही परीक्षा चालू आहेत मात्र याकडे संबंधित प्रशासन काहीही लक्ष देत नसल्याने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण ग्रामस्थांना पुन्हा होऊ लागली आहे दादा तुम्ही परत या असेही ग्रामस्थांकडून बोलले जाते आता ही व्यथा नक्की मांडायची तरी कोणाकडे कारण दादा असते तर लगेच क्विक ऍक्शन घेत होते व जिथल्या तिथे विषय मिटत होता आणि अधिकारीही घाबरत होते विशेषता ग्रामीण भागातील जनतेची खूप जाण असणारे दादा.व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या दादा लगेच सोडवत असे विशेषता दादांचे लक्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान न होऊन देणे आपल्या आपल्या भागातील ग्रामस्थांना कोणताही त्रास झालेला त्यांना सहन होत नव्हता हा लोड शेडिंग चा प्रश्न अजितदादा पवारांनी एका मिनिटात मिटवला असता परंतु आता एवढे दिवस होऊन ही लोड शेडिंग मात्र चालूच आहे उखाड्याने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे म्हणूनच ग्रामीण भागांतील ग्रामस्थ आता दादा तुम्ही परत या परत या आशा व्यक्त करू लागले प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे का ही पाहण्याचे वेळ आली.










