• Home
  • माझा जिल्हा
  • शाळेत जावे तरी कसे, दररोज पाण्यातून वाट काढावी लागते….
Image

शाळेत जावे तरी कसे, दररोज पाण्यातून वाट काढावी लागते….

प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील तिवळी येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाळ्यात शाळेच्या संपूर्ण आवारात पावसाचे पाणी नेहमीच साचले जाते

त्याच पाण्यातून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच, सचिव, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी याबाबत दखल घ्यावी.

दररोज विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जावे लागते. संपूर्ण जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी भरलेले असते त्यामुळे दररोज शाळेत ये-जा करतांना पाण्यातूनच वाट काढावी लागते,

याबाबत विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ होऊ नये अशी आर्त हाक स्थानिक पालकांच्या तोंडून निघत आहे.येथे वर्ग १ ते ७ पर्यंत आहेत .तरी याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व अन्य जबाबदार मंडळींनी दखल घेऊन शाळेच्या आवारात पाणी राहणार नाही याबाबतची दखल घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या माता-पित्याने केली आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026