• Home
  • माझा जिल्हा
  • प्रेरणादायी निरंकारी साधे विवाह दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात ४५ जोडपी विवाहबद्ध
Image

प्रेरणादायी निरंकारी साधे विवाह दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात ४५ जोडपी विवाहबद्ध

प्रतिनिधी

            निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी नागपुरच्या मिहान जवळ आयोजित केलेल्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या जागेवर एकंदर ४५ जोडपी विवाहबद्ध झाली.

            नव विवाहित वधूवरांना सदगुरु माताजींनी गृहस्थ जीवन भक्ति करत व्यतीत करण्यासाठी आशीर्वाद प्रदान केला तसेच निरंकारी पद्धतीने साधे विवाह करण्याची निवड केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

            या सामूहिक विवाह कार्यक्रमात वधूवरांनी पारंपारिक जयमाला (वरमाला) एकमेकांच्या गळ्यात घातल्या. याशिवाय निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सामायिक हार निरंकारी मिशनच्या प्रतिनिधींनी प्रत्येक जोडप्याला परिधान केले. लांवांच्या (मंगलाष्टका) दरम्यान सद्गुरु माताजी व राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षाव करुन आपला आशीर्वाद प्रदान केला. त्याचप्रमाणे वधूवरांच्या कुटुंबियांनीही त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. हे दृश्य खरोखरच अलौकिक होते.

            आजच्या या शुभ प्रसंगी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून एकंदर ४५ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यामध्ये मुंबई, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, चंद्रपुर, चिपळूण (रत्नागिरी), धुळे, डोंबिवली, गडचिरोली, जालना, कोल्हापुर, नागपुर, पालघर, पुणे सोलापुर, ठाणे, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतील वधूवरांचा समावेश होता.

           सामूहिक विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची उचित व्यवस्था समागम स्थळावर करण्यात आली. उल्लेखनीय आहे, की या साध्या पद्धतीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर तसेच उच्च शिक्षित नवजवान व नवयुवतींचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकले असते. परंतु सद्गुरुच्या पावन छत्रछायेत त्यांची दिव्य शिकवण धारण करुन साध्या पद्धतीने विवाह करण्याचे एक आदर्श उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले.

           नि:संदेह साध्या विवाहांचे हे अलौकिक दृश्य जाती, वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते जो निरंकारी मिशनचा संदेश देखील आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026