• Home
  • माझा जिल्हा
  • निवडणूक लागली, शस्त्रे शासनाकडे जमा करण्याची वेळ झाली!
Image

निवडणूक लागली, शस्त्रे शासनाकडे जमा करण्याची वेळ झाली!

प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकनिमित्त जिल्ह्यातील परवानाधारक अग्नीशस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून या कार्यवाहिकडे पाहिले जाते. आचारसंहिता लागता क्षणी ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश आहे. गृह विभागाचे परिपत्रक, यासंदर्भातील ४१७१/२०१४ ही विजय पाटील व शीतल पाटील विरुद्ध सरकार ही जनहित याचिका( रिट पिटीशन) , उच्च न्यायालयाचा १० जुलै २००९ रोजीचा निकाल आणि निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश लक्षात घेऊन जिल्हा छाननी समिती कोणाची अग्नीशस्त्रे जमा करायची याचा निर्णय घेते.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा प्रमुख समावेश असलेली समिती सर्व ठाणेदारांना जमा करण्याचे निर्देश देते. प्रामुख्याने निवडणूक काळातील दंगलीत थेट सहभागी, गुन्हे दाखल झालेले या वर्गवारीतील परवानाधारकांची अग्नीशस्त्रे जमा करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांचे पोलीस रेकॉर्ड देखील पाहण्यात येणार आहे. यामुळे राजकारण्यांना या कारवाईची फारशी झळ पोहोचणार नाही. तसेच बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची अग्नीशस्त्रे जमा करण्यात येणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

बुलढाणा जिल्ह्यात ही कार्यवाही सुरू झाली आहे. पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्नीशस्त्रे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ७ दिवसांनी परत देण्यात येणार आहे. ११ जुननंतर ही कारवाई होईल. जिल्ह्यातील परवाना धारक अग्नीशस्त्र संख्या ६०५ इतकी आहे. यामध्ये प्रामुख्याने १३ बोअर चे पिस्टल आणि हॅन्डगन चा समावेश आहे. सर्वसामान्य या दोघा शस्त्राना सारखे समजतात. मात्र,या दोन्हीमध्ये फरक आहे. आकाराने लहान व हातात सहज मावते ती हँडगन होय.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026