• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल
Image

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस उत्पादक सभासदांची शुद्ध दिशाभूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. कारखान्याचे गाळप नियोजन आणि उपलब्ध उसाची आकडेवारी पाहता, जाहीर केलेले अनुदान केवळ कागदावरच राहण्याची चिन्हे असल्याचे समितीने म्हटले आहे. डिसेंबर मध्येच सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाने  सभासदांना एप्रिल फुल केल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे?

​शेतकरी कृती समितीचे श्री. सतिशराव काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कारखान्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्याने कोट्यवधी रुपये खर्च करून गाळप क्षमतेत विस्तारवाढ केली आहे. सध्या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता १० हजार मे. टन असून १५ डिसेंबर २०२५ पर्यंत कारखान्याने ४ लाख मे. टनापेक्षा जास्त उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

​कारखान्याचे सरासरी गाळप क्षमता लक्षात घेता, १५ मार्च २०२६ पर्यंत अंदाजे १३ लाख मे. टनाचे गाळप पूर्ण होईल. अशा स्थितीत आहे  कारखान्याने मार्च महिन्यातील तुटणाऱ्या उसास २०० रुपये आणि एप्रिल महिन्यातील उसास ३०० रुपये प्रति मे. टन अनुदान जाहीर केले आहे. मात्र, उपलब्ध उसाचे गणित पाहता ३१ मार्च २०२६ पूर्वीच कारखाना बंद होण्याची दाट शक्यता आहे. मग एप्रिलमधील हे ३०० रुपयांचे अनुदान नक्की कोणाला दिले जाणार आणि त्याचा फायदा कोणत्या सभासदाला होणार? असा रोखठोक सवाल समितीने उपस्थित केला आहे.

​सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुरू, पूर्वहंगामी आणि खोडवा ऊस मोठ्या प्रमाणावर बाहेरील कारखान्यांना गाळपासाठी जात आहे. जर प्रशासनाला खरोखरच सभासदांचे हित जपायचे असेल, तर त्यांनी जानेवारी २०२६ पासूनच गाळपास येणाऱ्या उसाला अनुदान जाहीर करणे आवश्यक होते. विशेषतः खोडवा उसाला ३०० रुपये अनुदान दिल्यास सभासदांना दिलासा मिळेल आणि कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाणार नाही, असेही काकडे यांनी नमूद केले आहे.

​समितीच्या प्रमुख मागण्या:

• ​अनुदानाचा फेरविचार: चेअरमन आणि संचालक मंडळाने घेतलेल्या या चुकीच्या निर्णयाचा फेरविचार करून त्यात दुरुस्ती करावी.
• ​कार्यकाळ: अनुदान देण्याचा कालावधी बदलून तो जानेवारी महिन्यापासून लागू करावा.
• ​केवळ सभासदांना लाभ: जाहीर केलेले अनुदान हे केवळ हक्काच्या सभासदांनाच द्यावे, गेटकेनधारकांना देऊ नये.
​प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सुधारित अनुदान धोरण जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी कृती समिती, सोमेश्वरनगरच्या वतीने करण्यात आली आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026