17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Releated Posts

फार्मर आयडी नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी. पुणे, दि.२९ : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला असून अद्यापही ज्या…

ByBymnewsmarathi Apr 29, 2026

वडगाव निंबाळकर अंकित करंजे पूल पोलीस चौकीतील पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन 

संपादक मधुकर बनसोडे. दोन दिवसापूर्वी नींबूत येथील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये एक 42 वर्षाचा तरुण दिवसभर त्याच परिसरामध्ये…

ByBymnewsmarathi Apr 25, 2026

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज- डॉ. किरण पाटील

*पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे मार्गदर्शक तत्वे जारी* पुणे, दि. २२: राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका…

ByBymnewsmarathi Apr 22, 2026

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज- डॉ. किरण पाटील

*पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे मार्गदर्शक तत्वे जारी* पुणे, दि. २२: राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका…

ByBymnewsmarathi Apr 22, 2026