• Home
  • माझा जिल्हा
  • निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध
Image

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध

प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड- महाराष्ट्राच्या ५६व्या निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी येथील मैदानावर सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात अत्यंत मंगलमय वातावरणात ४८ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

            साध्या व सामूहिक विवाहांना चालना देण्याच्या संत निरंकारी मिशनच्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत साधेपणाने, पण तरीही अत्यंत प्रभावशाली स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ (सांझा हार) घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या शेवटी सदगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी तसेच विवाहासाठी आलेले नवदांपत्यांचे नातलग व उपस्थित भाविक-भक्तगणांकडून वधुवरांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

            विवाह समारोहाच्या शेवटी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दांपत्यांना आपल्या दिव्य वाणी द्वारे पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की या समारोहामध्ये वर-वधूंचे वैवाहिक नाते जोडले गेल्याने दोन्ही बाजुच्या परिवारांचे मिलन घडून आले आहे. त्यांनी एकमेकांचा मनापासून स्वीकार करावा. वर-वधूंनी आपसात ताळमेळ ठेवून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांचा अंगिकार करावा आणि जीवनात येणाऱ्या अडी-अडचणींची सोडवणूक करावी. निरंकारी विवाहांचे वैशिष्ट्य असलेला सामायिक हार हा गृहस्थीची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही समान आहे. त्यांनी आपल्या जीवनात सत्संग, सेवा आणि स्मरण करत निराकार प्रभूला प्राथमिकता द्यावी. शेवटी, सदगुरु माताजींनी नव विवाहित दांपत्यांच्या जीवनात आध्यात्मिक पैलू सदृढ राहावा आणि त्यांचे जीवन आनंदमय व्हावे, अशी मंगल कामना केली.

            आजचा हा विवाह सोहळा आंतरराज्यीय स्वरुपाचा होता. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबाद, चिपळूण, नाशिक, सोलापूर, डोंबिवली, सातारा, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि अहमदनगर क्षेत्रातील वर-वधू या विवाह सोहळ्यात सहभागी होते. या व्यतिरिक्त पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही वर-वधू आले होते.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026