• Home
  • माझा जिल्हा
  • शाळेत जावे तरी कसे, दररोज पाण्यातून वाट काढावी लागते….
Image

शाळेत जावे तरी कसे, दररोज पाण्यातून वाट काढावी लागते….

प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील तिवळी येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाळ्यात शाळेच्या संपूर्ण आवारात पावसाचे पाणी नेहमीच साचले जाते

त्याच पाण्यातून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच, सचिव, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी याबाबत दखल घ्यावी.

दररोज विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जावे लागते. संपूर्ण जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी भरलेले असते त्यामुळे दररोज शाळेत ये-जा करतांना पाण्यातूनच वाट काढावी लागते,

याबाबत विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ होऊ नये अशी आर्त हाक स्थानिक पालकांच्या तोंडून निघत आहे.येथे वर्ग १ ते ७ पर्यंत आहेत .तरी याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व अन्य जबाबदार मंडळींनी दखल घेऊन शाळेच्या आवारात पाणी राहणार नाही याबाबतची दखल घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या माता-पित्याने केली आहे.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026