• Home
  • माझा जिल्हा
  • ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचे उद्घाटन निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते संपन्न
Image

७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचे उद्घाटन निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते संपन्न

प्रतिनिधी

            सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवार, दि.१७ सप्टेंबर रोजी समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या पावन भूमीवर करण्यात आला. जसे सर्वविदितच आहे, की यावर्षी वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २८,२९ व ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे.

            या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, सेवादल अधिकारी, स्वयंसेवक तसेच दिल्ली व जवळपासच्या राज्यांसह इतर राज्यांतील भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दिव्य जोडीचे हार्दिक स्वागत केले.

उल्लेखनीय आहे, की भव्य रुपात आयोजित करण्यात येत असलेल्या या या संत समागमाच्या पूर्वतयारीसाठी समागम सेवांमध्ये भाग घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड परिक्षेत्रातील सेवादल सदस्य व अन्य भक्तगणांच्या तुकड्या समागम स्थळावर पोहचत असून समागम संपन्न होईपर्यंत सातत्याने आपल्या सेवा देत राहणार आहेत.

            सेवांच्या या शुभारंभ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सेवा केवळ तनाने होत नाही तर मनापासून केली जाते आणि तेव्हाच ती सार्थक गणली जाते. नि:स्वार्थ व निष्काम भावनेने केलेली सेवा सर्वोत्तम असते असे सांगून त्या म्हणाल्या, की ब्रह्मज्ञानाचा बोध प्राप्त झाल्यानंतरच आपल्या अंत:करणात ‘नर सेवा, नारायण पूजा’ हा उदात्त भाव उत्पन्न होतो. कारण त्यावेळी आपण प्रत्येक मानवामध्ये या निराकार प्रभूचेच रूप पाहत असतो.

            सद्गुरु माताजींनी सेवेच्या सार्थकतेबद्दल निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की निरंकारी मिशनच्या प्रत्येक भक्ताने याठिकाणी प्राप्त होणाऱ्या उदात्त शिकवणूकीतून सतत प्रेरणा घेऊन एका सुंदर समाजाच्या नवनिर्मितीमध्ये आपले योगदान द्यावे.

            समागम स्थळावर सेवांचे विधिवत् उद्घाटन झाल्याबरोबर सेवेला ईश्वर भक्तीचा एक अनुपम उपहार मानणारे भाविक भक्तगण हजारोंच्या संख्येने मोठ्या तन्मयतेने सक्रीय झाले आणि आपापला खारीचा वाटा उचलु लागले. भाविक भक्तगणांना हे चांगले ठाऊक आहे, की निस्वार्थ भावनेने तन-मन-धनाने केली जाणारी सेवा ही भक्तीचे सरळ आणि प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच ते कोणत्याही सेवेची संधी न दवडता ‘नर सेवा, नारायण पूजा’ ही भावना कृतीत उतरवत तिला प्राथमिकता देतात. वास्तविक पाहता सेवेचा भावच मनुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवतेचा दिव्य संचार करत अहंकाररहित करतो.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026