Image

तलाठी भरती : १५ फेब्रुवारीपासून नियुक्तीपत्र वाटप

प्रतिनिधी

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी, प्रतीक्षा याद्या २३ जानेवारी रोजी रात्री उशीरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आदी प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रे पडताळणीत उभे आणि समांतर आरक्षण असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे असतात, ती कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे, हे तपासण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेत एखादा निवड झालेला उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांत १००-१२५ च्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे, त्या ठिकाणी दहा-बारा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. १५०-२०० च्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया पूर्ण करून १५ फेब्रुवारीनंतर संबंधितांना नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026