• Home
  • माझा जिल्हा
  • नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार
Image

नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार

प्रतिनिधी

कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात काम करीत असताना नागपुरातील तरुणी कोलकाताच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने प्रेमासाठी आई-वडील, घर सोडून प्रेमविवाह केला आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. ती नोकरीवर लागताच तिने घटस्फोट देण्याची तयारी केली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समुपदेशन करीत तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचविला.

देवदत्त आणि रिमा (बदललेले नाव) हे दोघेही कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात सक्रीय होते. देवदत्त हा पश्चिम बंगाल-कोलकातामधील रहिवासी होता. त्याने संगीत क्षेत्रात नाव कमावले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने रिमाची नागपुरात भेट झाली. दोघेही गीत-संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्कात होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. रिमाने सासरी जाण्याऐवजी वृद्ध आईच्या सेवेसाठी देवदत्त यालाच नागपुरात राहण्याची अट ठेवली. त्याने प्रेमापोटी अट मान्य करीत प्रेमविवाह केला.

लग्नानंतर काही दिवस हालाखीत जीवन कंठले. त्यानंतर देवदत्त हा शाळेत संगीत शिक्षक म्हणून कामाला लागला. त्याने पत्नी रिमालाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी सज्ज केले. तिनेही पतीला सकारात्मकता दाखवत पदवीला प्रवेश घेतला. त्यानंतर तिने पीएचडीसुद्धा केली. दोघांचाही सुखी संसार सुरु असताना त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर तिला प्राध्यापक पदावर नोकरी लागली. त्यानंतर मात्र, रिमाच्या स्वभावात फरक पडला. ती पतीला कमी लेखायला लागली आणि पतीचा वारंवार अपमान करीत होती. त्यामुळे संसारात खटके उडायला लागले.

गलेलठ्ठ पगारासमोर पतीचा मात्र तुटपुंज्या पगारामुळे ती पतीला टोमणे मारत होती. तिच्या जीवनशैलीत बदल झाला आणि ती किट्टी पार्टी, सिनेमा, महिलांच्या बैठका, कार्यक्रम-समारंभात वावरत होती. तिला साध्याभोळ्या पतीचा कंटाळा आला होता. त्यामुळे तिला साथ देणारा मित्र हवा होता. त्यामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेण्याचा विचार केला. दुसरीकडे मात्र देवदत्त हा पत्नीच्या निर्णयामुळे खचून गेला.

पत्नीच्या निर्णयामुळे दुःखी झालेल्या देवदत्तने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी बाजू ऐकून घेतली. समुपदेशक पाटील यांनी दोघांना भरोसा सेलमध्ये बोलावले. गरीबीत काढलेले दिवस आणि शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची रिमाला आठवण करून दिली. पतीने केलेला आईवडिल, नातेगोते आणि घराचा त्याग लक्षात आणून दिला. दोघांची समजूत घातली. मुलीनेही आईशी चर्चा करून उर्वरित आयुष्यात वडिलांची साथ महत्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचला.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026