• Home
  • क्राईम
  • आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
Image

आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त

प्रतिनिधी

मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे तीन वर्षांपासून रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) हा आंध्रप्रदेशातून आलेला इसम परिसरातील शेतकऱ्यांना भुलथापा देऊन जमिनी भाडेतत्त्वावर घेणे, शेतात चोरबिटीचा वापर करीत असल्याची माहिती गुणनियंत्रक पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकून ९ लाख ४८ हजार रुपये किमतीचे तब्बल पाच क्विंटल कापसाचे चोरबिटी बियाणे जप्त करून गुन्हा दाखल केला. या कारवाईने चोरबिटी बियाणांचा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मूल तालुक्यातील बोरचांदली, चांदापूर, बेंबाळ, जुनासुर्ला आदी गावात भाडे तत्त्वावर शेती घेऊन चोरबिटीची लागवड केल्या जात होती. त्यामुळे जमिन नापिकी होत होती. नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक शेंडे, चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, जिल्हा परिषद चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधिकारी विरेंद्र राजपूत, विभागीय गुण नियंत्रक अधिकारी लंकेश कटरे यांनी मूल तालुक्यात करडी नजर ठेवली होती. दरम्यान २० फेब्रुवारीला गुणनियंत्रक पथकाने चांदापूर हेटी येथील रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) यांच्या शेतात छापा टाकून तपासणी केली केली असता मिरची व कापूस लागवड केलेल्या शेतात असलेल्या स्लॅबच्या घराच्या बाजूला उभ्या केलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये दहा पोते खुले अनधिकृत पाच क्विंटल एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आले.

कृषी विभागाच्या पथकाने ९ लाख ४८ हजार रुपयांचे बियाणे, ट्रॅक्टर असा १३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिस स्टेशन मूलमध्ये जमा केला. तसेच रवीकुमार गाेटेपट्टी विरुद्ध तक्रार केली.ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी लंकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी श्रावण बोडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, पंचायत समिती मूलचे कृषी अधिकारी किशोर चौधरी, सुनील कारडवार आदींनी केली.

Releated Posts

तोतया पत्रकार लूट प्रकरणात अटकेत; महिला पोलीस हवालदारासह दोघे सहआरोपी

प्रतिनिधी नवले पूल परिसरात व्यावसायिकाची मोटार अडवून एक कोटी रुपयांची लूट प्रकरणात नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकाराला अटक केली.…

ByBymnewsmarathi Jul 26, 2026

दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या; २३ वर्षांनंतर मुलाने घेतला सूड, मुख्य आरोपीचा २८ वार करून खून

प्रतिनिधी पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी घडलेल्या खून प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

3 मुलांना स्कॉर्पिओवरून बसवून काढली धिंड; चप्पलेनं मारणाऱ्या महिलेलाच पोलिसांनी हटकलं !

प्रतिनिधी पुणे आता बिहारच्या पलीकडे गेलं असं म्हणणे हे चुकीचं ठरणार नाही. मारामारी, खून आणि कोयत्याने हल्ले करण्याच्या…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026