• Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती तालुक्यातील प्रशालेंमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का ? विद्यार्थ्यांना का पैसे घालवून लावावे लागतात एक्स्ट्रा क्लासेस” बारामती गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती गांभीर्याने लक्ष्य द्यावे नागरिकांची मागणी .

बारामती तालुक्यातील प्रशालेंमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का ? विद्यार्थ्यांना का पैसे घालवून लावावे लागतात एक्स्ट्रा क्लासेस” बारामती गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती गांभीर्याने लक्ष्य द्यावे नागरिकांची मागणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

भविष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शाळा/कॉलेज असेल तरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य सुधरते व भविष्यात आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगले ज्ञान मिळवून भविष्यात काहीतरी करता येईल यामुळे पालकांनी शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले आहे. यामध्ये आता विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्लास लावण्याची गरज का पडते ? असा प्रश्न नागरिक व पालकांमध्ये पडला आहे .

प्रशालेमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का? का प्रशालेमध्ये शिकवलेच जात नाही ? यावर बारामती तालुका गटशिक्षण अधिकारी यांनी बारामती तालुक्यातील सर्व प्रशालॆऺवरती लक्ष्य देऊन शाळा / कॉलेज मधील शिक्षण यामध्ये कशी सुधारना येईल याकडे लक्ष्य दिले पाहिजे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे .

भारत हा संपूर्ण डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जातो तरी देखील काही शाळा , कॉलेजमध्ये डिजिटल सुविधा व डिजिटल पद्धतीनं शिकवत नसल्याचे निदर्शनास येत आहे ?. शाळा/कॉलेज म्हणजे संपूर्ण प्रात्यक्षिक युग झालेले आहे. हे प्रात्यक्षिक प्रशालेमध्ये शिकवून व करून दाखवले जाते का? का शिक्षक आपली शिक्षक असल्याची भूमिका फक्त पुस्तक वाचून निभावतात? शिक्षकांचे शिकवण शाळा कॉलेजमध्ये व्यवस्थित असेल तर विद्यार्थ्यांना बाहेर एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची गरज पडती का व कशासाठी? अश्या प्रश्नांची चर्चा पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये होत असताना सर्वत्र दिसत आहे .

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून बारामती गटशिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

Releated Posts

मदने कुटुंबीयांकडून वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता झाडांना विसर्जित.

प्रतिनिधी – आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही…

ByBymnewsmarathi Feb 4, 2026

संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती निंबुत मध्ये उत्साहात साजरी 

  प्रतिनिधी. संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती नींबूत येथे साजरी करण्यात आली. भारतीय संत…

ByBymnewsmarathi Feb 1, 2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान व मतमोजणी तारखेमध्ये बदल. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.

प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा…

ByBymnewsmarathi Jan 29, 2026

करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ

प्रतिनिधी. करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026