• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर चे चेअरमन संचालक मंडळ थोडे शेतकी विभागावरती लक्ष द्याल का?
Image

सोमेश्वर चे चेअरमन संचालक मंडळ थोडे शेतकी विभागावरती लक्ष द्याल का?

संपादक मधुकर बनसोडे.

सोमेश्वरच्या उत्पादक शेतकऱ्याची चेअरमन व संचालक मंडळ यांना भावनिक हक्क. ऊस उत्पादकाच्या ऊस बिलातून भरगच्च पगार घेणारे काही अधिकारी कर्मचारी पंख्याखालच्या खुर्चीतून उठून थोडे शेताच्या बांधावरती जाण्याचे आदेश द्याल का?

कारखाना सुरू झाला काही उसाला तोडी आल्या ऊस तोड मजूर कमी असल्याचे वारंवार सांगून शेतकऱ्याची मानसिक खच्चीकरण केले आणि याचाच फायदा ऊस तोड मजुरांनी घेतला? उसाला तोड आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उसाच्या कांड्या राहत आहेत मात्र याकडे पाहण्यासाठी किंवा ऊसतोड मजुरांना सूचना देण्यासाठी शेतकी खात्यातील ओव्हर शिअर खुर्चीतून बाहेर गेलेले दिसत नाहीत? काही ओव्हर शिअर फक्त मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस तोड कशी होत आहे याची पाहणी करतात एक एकर शेतजमीन असणाऱ्या ऊस उत्पादकाने तक्रार केली तरीही शेतकी खात्याचे ओव्हर शिअर टाळी मारून, हसून विषय मारून नेतात अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे!अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड ही कमजोर होत चाललेली आहे का अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड ( वचक, दबदबा ) जर कमी होत असेल तर अशा संस्था भविष्यात तोट्यात जातात असे म्हटले जाते

शेतकी विभागाकडे एखादा शेतकरी तक्रार घेऊन गेल्यास नेहमीच टाळाटाळीची उत्तरे दिली जातात.

आम्हाला संचालकाने कामाला लावले आहे आमचं कोणीही काहीही करू शकत नाही आमचा संचालक स्ट्रॉंग आहे. अशा भावना सोमेश्वर कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आहेत? शेतकी विभागात गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर्जाहीन पद्धतीची वागणूक दिली जाते. दक्षिणेच्या नावाखाली ऊस तोडीसाठी सर्रास शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात? या उकळलेल्या पैशांमध्ये शेतकी विभागातील कोणाचा वाटा असतो का? याची शहानिशा कारखाना प्रशासनाने केली पाहिजे अगोदरच अतिवृष्टीने उसाचे पीक हे खराब झाल्यामुळे चालू सीजन ला उसाला एव्हरेज बसत नाही त्यातच जर कारखान्यातील काही कर्मचारी अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्याचे असे नुकसान होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल?

इतर गटांपेक्षा गट नंबर एक मधील ऊसतोड उशिरा होत आहे असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे मात्र आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांना आमच्या अडचणी कडे पाहणीसाठी वेळच नाही आशा देखील भावना ऊस उत्पादक व्यक्त करीत आहे. काही शेतकरी लवकरच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार असल्याचेही बोलले जात आहे.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026