उपसंपादक- अक्षय थोरात
मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि भक्ती, सेवा व संस्काराचं प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडीबा मोरडे (अण्णा गुरुजी) यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी वारकरी सेवेचं रोवलेलं बीज आज वटवृक्षात रूपांतरित झालं आहे. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालं असून, मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी पंढरपूरमध्ये हक्काचं घर उभं राहिल्याचा आनंद व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते मा. दिलीप वळसे-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, वारकरी सेवा मंडळ, देणगीदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी उभारलेली ही वास्तू उभी राहिली आहे. या कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांचं मनापासून कौतुक केलं. तसंच या वास्तूची स्वच्छता, जपणूक आणि पावित्र्य कायम राखणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचंही अधोरेखित केलं.
यावेळी आदरणीय दादांच्या पंढरपूर विकासाच्या दूरदृष्टीचाही आवर्जून उल्लेख केला. वारकऱ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पंढरपूर जागतिक दर्जाचं धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावं, यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. पालखी मार्ग, पायाभूत सुविधा आणि वारकरी-केंद्रित विकासकामांमागे त्यांची स्पष्ट भूमिका आणि दूरदृष्टी होती. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित विकासकामं पूर्ण करण्यासाठी आम्ही शासन म्हणून कटिबद्ध असल्याचंही यावेळी नमूद केलं.
तसंच, वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ₹४,००० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट, पालखी तळ, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमुळे वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील, असंही मी नमूद केलं.
आषाढी वारीसाठी शासनाकडून सर्व आवश्यक नियोजन करण्यात आलं असून, प्रत्येक वारकऱ्याची वारी सुखकर, सुरक्षित आणि मंगलमय व्हावी, हीच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना व्यक्त केली.
















