Image

आधारची कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत

प्रतिनिधी

गेल्या दशकात आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जातो.

ज्या रहिवाशांनी 10 वर्षांपूर्वी आधार क्रमांक घेतला आहे आणि ज्यांनी तेव्हापासून ते कधीच अद्ययावत केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना त्यांच्या कागदपत्रांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रोत्साहित केले जाते.

मात्र ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याचे चुकीचे वृत्त गुरुवारी काही वृत्तपत्रांनी दिले आहे. या चुकीच्या वृत्ताकडे आणि समाज माध्यमांतील पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करण्यात आली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने यापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आधार कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी आपण रहिवाशांना आवाहन आणि प्रोत्साहित करत आहोत, असे त्यात युआयडीएआयने अधोरेखित केले आहे. रहिवासी दर 10 वर्षांनी आधार कागदपत्रे अद्ययावत करू शकतात हे नुकत्याच जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे.

त्यामुळे राहणीमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण होते. युआयडीएआयने नेहमीच रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे आणि ही अधिसूचना त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026