प्रतिनिधी.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सकाळी आठ वाजता निंबूत येथे पारंपारिक पद्धतीने पार पडली.
यावेळी निंबूत गावातील तरुणांनी पुरंदर किल्ल्यावरून ज्योत आणली आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करीत संपूर्ण गावांमधून ज्योत फिरवण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास शेतकरी कृती समितीचे नेते श्री सतीश राव काकडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी नींबूत गावातील तरुण वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.