• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियानचा कार्यक्रम सदोबाचीवाडी येथे संपन्न.
Image

बारामती ! भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियानचा कार्यक्रम सदोबाचीवाडी येथे संपन्न.

प्रतिनिधी –

दिनांक 29 मे 2025 रोजी केंद्र शासन -भारत सरकार संकल्पित “विकसित कृषी संकल्प अभियान 2025” या शेतकरी अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथून करण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगाव खुर्द,कृषी विज्ञान केंद्र बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांचे संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यामधून करण्यात आली.

सदरील अभियानाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.रतन जाधव यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात राबविलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. त्याचबरोबर राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगाव बु. च्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.रिंकू डे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वनिता साळुंके यांनी सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्यामुळे वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा रोगप्रतिकार करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विकास भालेराव यांनी विद्यापीठांतर्गत तयार करण्यात आलेल्या नवनवीन वाणांची व त्या वाणांच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येणाऱ्या खरीप हंगामात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाणांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले. यावेळी उप कृषि अधिकारी श्री माने , सहाय्यक कृषी अधिकारी श्री निरंजन घोडके व रणजित धुमाळ, आत्माचे श्री गणेश जाधव उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थिती दाखवली.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026