• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयाची ५३ वर्षात वैभवशाली प्रगती- डॉ. प्रशांत साठे
Image

काकडे महाविद्यालयाची ५३ वर्षात वैभवशाली प्रगती- डॉ. प्रशांत साठे

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा ५३ वा वर्धापन दिन २० जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॄहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रोफेसर मा. डॉ. प्रशांत साठे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभासदस्य तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यातील तरतुदी, महाविद्यलयाच्या समोरील संधी आणि नवी आवाहने याबाबत सविस्तर विवेचन केले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालयाचे सचिव श्री सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी ते म्हणाले ५३ वर्षात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले, यावेळी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमान्यामध्ये आपली बुद्धिमत्ता ही कृत्रिम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण महागड्या वस्तू वापरल्या म्हणजे बुद्धिमान नसून बुद्धीच तुम्हाला वरच्या दर्जा वरती नेऊन ठेवते. अनुभूती व अनुभवातून शिक्षण घेऊन त्या शिक्षणातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताला जर विकसित करायचे असेल तर ‘PUARA- Provision of Urban Amenities to Rural Area’ नावाचे तत्त्वज्ञान वापरले पाहिजे तरच भारत हा विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला. या महाविद्यालयाने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली ही एक अभिमानाची गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचे आहे, कोणतेही काम करत असताना पुढील पाच ते सात वर्ष नियोजन आराखडा आपल्या जवळ असला तरच तो जीवनात यशस्वी होऊ शकतो असे आवर्जून सांगितले आणि शेवटी त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आधिसभा सदस्य ॲड. मा.संदीप कदम यांनी महाविद्यालयाने ५३ वर्षात तळागाळातील, वंचित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन केलेले प्रगती हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे आवर्जून सांगितले. आज महाविद्यालय ५३ वर्षांचा खडतर प्रवास करून यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आहे यासाठी चार घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे ते घटक म्हणजेच व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या योगदानामुळेच ते शक्य झाले आणि शेवटी. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाने केलेल्या प्रगती आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी या विषयी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय मनोगता मध्ये अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले म्हणून त्यांचे स्वागत व आभार मानले व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी मानले.

Releated Posts

कामाच्या तासानंतर ‘डिस्कनेक्ट’ राहण्याचा हक्क: ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर 

प्रतिनिधी ​कर्मचाऱ्यांच्या ताणमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; खासगी सदस्याचे विधेयक सादर.  आधुनिक कार्यशैलीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि कामाच्या तासांनंतरही…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

प्रवेशापूर्वी गर्भधारणा चाचणीची सक्ती; चौफेर टीका झाल्यावर नियम तत्काळ रद्द;

प्रतिनिधी   ​पुणे जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ (गर्भधारणा चाचणी) अनिवार्य करण्यात आल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा

प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

तुऱ्यामुळे उसाच्या उत्पादनाची चिंता आणि कारखान्यापुढील आव्हान

संपादक- मधुकर बनसोडे ​सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025