• Home
  • माझा जिल्हा
  • सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.
Image

सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.

प्रतिनिधी –

सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न करता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.

रस्त्यालगत असलेली व अडथळा निर्माण करणारी झाडे अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मुळासकट उपटून सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात यावे. त्यामुळे वृक्षांना जीवनदान मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष रफीक शेख, खंडाळा तालुका उपाध्यक्ष दिपक बाटे आणि लोणंद शहराध्यक्ष रोहित कोळेकर यांनी जिल्हाधिकारी सचिन पाटील यांना दिले.

पर्यावरण संरक्षण आणि विकासकामे या दोन्हींचा समतोल राखतच रस्ता रुंदीकरण व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026