• Home
  • माझा जिल्हा
  • नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.
Image

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून वीर धरण ७५.८०% भरले आहे.

वीर धरणामध्ये पाण्याची आवक व पावसाचा जोर पाहता वीर धरणामधून  दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता १००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच धरणामध्ये येणा-या पाण्याच्या येव्यानुसार आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सबब वीर धरणाच्या खालील बाजूस निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नीरा नदी काठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026