• Home
  • माझा जिल्हा
  • नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.
Image

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून वीर धरण ७५.८०% भरले आहे.

वीर धरणामध्ये पाण्याची आवक व पावसाचा जोर पाहता वीर धरणामधून  दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता १००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच धरणामध्ये येणा-या पाण्याच्या येव्यानुसार आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सबब वीर धरणाच्या खालील बाजूस निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नीरा नदी काठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026